शशिकला काकोडकरांच्या मृत्यूचा धक्का पचवतो न पचवतो तोच पळशीकरांच्या मृत्यूची बातमी आली .
गांधीविचाराची चार स्कुल्स आहेत
१ काँग्रेसवाद
२ कर्मठ गांधीविचार
३ मुक्त गांधीविचार
४ सर्वोदयवाद
पळशीकर हे तिसऱ्या मुक्त गांधीविचार स्कुलचे साठोत्तरी विचारवंत होते सर्वांना सोबत घेऊन जाणे, पारंपरिक लोकांना पेचात टाकण्याऐवजी त्यांना नाजूक हातांनी परंपरेतून बाहेर काढणे ही गांधींची वैशिष्ट्ये ह्या स्कुलमध्ये असतातच पण जिथे गांधी मागासलेले वाटतात तिथे त्यांचा हात सोडून पुढील दिशेने पाहणे हेही ह्या स्कूलमध्ये घडते पळशीकरांची वैचारिक वाटचाल ही ह्या स्कूलला समृद्ध करणारी होती
त्यांचा माझा परिचय हा ''नवभारत'' मध्ये १९९९साली त्यांनी संपादक म्हणून '' श्रीधर तिळवे :मराठीचा पहिला पोस्टमॉडर्न कवी'' हा लेख छापायला घेतला तेव्हा झाला मी पोस्टमॉडर्न च्या कट्टर विरोधात असूनही ज्याचे त्याचे वैचारिक स्वातंत्र्य म्हणून छापू दिला प्रत्येक संदर्भाची खातरजमा करत त्यांनी तो छापला मात्र ह्या निमित्ताने ते संपादक म्हणून किती चोखंदळ आहेत हे कळून चुकले .
ते केवळ चोखंदळ न्हवते तर सर्वसमावेशक आणि समग्र पाहणारे होते अनेक साठोत्तरी विचारवंतांचा आखूडशिंगीपणा त्यांच्यात न्हवता . उलट मोकळ्या संवादावर त्यांचा विश्वास होता फक्त अकॅडेमिक विचारवंतांना कवटाळण्याऱ्या महाराष्ट्रात त्यांचे लेखन दखलपात्र झाले हेच मुळी आश्चर्य ! ते कुणी ना कुणी समग्र स्वरूपात प्रकाशित करणे गरजेचे आहे साठोत्तरी पिढीचे अनेक वैचारिक धाग्यांचे ताणेंबूणे त्यातून स्पष्ट होतील नेमाडेंच्या देशीवादातील परंपरेपेक्षा त्यांचा परंपरेबाबतचा विचार हा महाराष्ट्राला अधिक पुढे न्हेणारा आहे . केवळ झंझावाती लेखन करण्याऱ्यांना कवटाळण्यापेक्षा पळशीकरांसारख्या मृदू विचारवंतांनाही प्रतिसाद देणे हे आवश्यक आहे ,
त्यांना नमस्कार करण्याचीही माझी लायकी नाही तरीही त्यांना माझा शेवटचा नमस्कार ! जय नवभारत !
श्रीधर तिळवे नाईक
गांधीविचाराची चार स्कुल्स आहेत
१ काँग्रेसवाद
२ कर्मठ गांधीविचार
३ मुक्त गांधीविचार
४ सर्वोदयवाद
पळशीकर हे तिसऱ्या मुक्त गांधीविचार स्कुलचे साठोत्तरी विचारवंत होते सर्वांना सोबत घेऊन जाणे, पारंपरिक लोकांना पेचात टाकण्याऐवजी त्यांना नाजूक हातांनी परंपरेतून बाहेर काढणे ही गांधींची वैशिष्ट्ये ह्या स्कुलमध्ये असतातच पण जिथे गांधी मागासलेले वाटतात तिथे त्यांचा हात सोडून पुढील दिशेने पाहणे हेही ह्या स्कूलमध्ये घडते पळशीकरांची वैचारिक वाटचाल ही ह्या स्कूलला समृद्ध करणारी होती
त्यांचा माझा परिचय हा ''नवभारत'' मध्ये १९९९साली त्यांनी संपादक म्हणून '' श्रीधर तिळवे :मराठीचा पहिला पोस्टमॉडर्न कवी'' हा लेख छापायला घेतला तेव्हा झाला मी पोस्टमॉडर्न च्या कट्टर विरोधात असूनही ज्याचे त्याचे वैचारिक स्वातंत्र्य म्हणून छापू दिला प्रत्येक संदर्भाची खातरजमा करत त्यांनी तो छापला मात्र ह्या निमित्ताने ते संपादक म्हणून किती चोखंदळ आहेत हे कळून चुकले .
ते केवळ चोखंदळ न्हवते तर सर्वसमावेशक आणि समग्र पाहणारे होते अनेक साठोत्तरी विचारवंतांचा आखूडशिंगीपणा त्यांच्यात न्हवता . उलट मोकळ्या संवादावर त्यांचा विश्वास होता फक्त अकॅडेमिक विचारवंतांना कवटाळण्याऱ्या महाराष्ट्रात त्यांचे लेखन दखलपात्र झाले हेच मुळी आश्चर्य ! ते कुणी ना कुणी समग्र स्वरूपात प्रकाशित करणे गरजेचे आहे साठोत्तरी पिढीचे अनेक वैचारिक धाग्यांचे ताणेंबूणे त्यातून स्पष्ट होतील नेमाडेंच्या देशीवादातील परंपरेपेक्षा त्यांचा परंपरेबाबतचा विचार हा महाराष्ट्राला अधिक पुढे न्हेणारा आहे . केवळ झंझावाती लेखन करण्याऱ्यांना कवटाळण्यापेक्षा पळशीकरांसारख्या मृदू विचारवंतांनाही प्रतिसाद देणे हे आवश्यक आहे ,
त्यांना नमस्कार करण्याचीही माझी लायकी नाही तरीही त्यांना माझा शेवटचा नमस्कार ! जय नवभारत !
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment