Thursday, March 16, 2017

कुठलाही मराठी माणूस दिल्लीत मोठा होणार म्हंटलं कि इतर मराठी राजकारणी लोकांची तोंडे झालीच वाकडी ! ह्यांना काय भाजपमध्ये दुसरा लायक माणूस मिळाला नसता का ? पण ह्यांचे इगो मोठे ह्यांना संरक्षण मंत्र्याच्या हाताखाली मंत्री व्हायचे आहे आलतूफालतू माणसाच्या हाताखाली नाही . शरद पवार प्राईममिनिस्टर झाले तर ह्या विचाराने ह्यांच्या पोटात गोळा ! शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेला विरोध करणारे हेच ! पहिल्या बाजीरावाचे   , होळकर शिंद्यांचे पाय खेचणारे हेच . आपल्या माणसाने टोपलीत महाराज व्हावे पण दिल्लीत नाही . ढसाळ नोबल मिळवू शकतात म्हंटल्यावर ह्यांनीच त्यांची निंदा चालू केली . परिणाम गेल्या पांच हजार वर्षात दिल्लीवर मराठी माणसाचे राज्य नाही . नतद्रष्टपणाचे नोबेल असेल तर ते प्रथम मराठी समाजाला मिळेल . परिकर तुमच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला गल्लीत आणल्याबद्दल समस्त गोवेकरांच्यावतीने मी तुमची माफी मागतो .
श्रीधर तिळवे -नाईक 
राजाच्या कपड्याची किंमत बघता तसे वाटत नाही आणि आपले लोक असे कि कपडे बघून आणि झेंडे बघून मत बनवतात आणि देतातही 

No comments:

Post a Comment